बुद्धांनी आपल्या भिक्षूंना अनेकदा ध्यानप्राप्तीसाठी झाडाखालच्या जागेची जागा म्हणून शिफारस केली. त्यांनी स्वतः, ज्ञानप्राप्तीच्या पूर्वसंध्येला, एका पिंपळाच्या (अश्वत्थाच्या )झाडाखाली ध्यान करण्याचा पर्याय निवडला. हेच कदाचित पूर्वीचे वृक्ष मंदिर असेल. बुद्ध ज्ञानप्राप्तीनन्तर चार आठवडे (काहींच्या मते सात आठवडे) बोधी वृक्षाजवळ राहिले. स्वाभाविकच, बोधी वृक्ष त्यांच्या ज्ञानप्राप्तीसाठीचे प्रतीक बनला. नंतर तो बोधिवृक्ष ज्ञानप्राप्तीच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करू लागला. असाही दावा केला जातो की बुद्धांनी बोधी वृक्ष त्यांच्या शिकवणुकीचे प्रतिनिधित्व करतो.
बुद्धांना सांची येथे कल्पवृक्ष किंवा इच्छा वृक्षाच्या स्वरूपात दर्शविले आहे. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत संपूर्ण अवकाशात पसरलेली ही जीवनाची बाग आहे. बौद्ध धर्म नैतिक दृष्टिकोनातून देखील जीवनवृक्षाला दर्शवतो. तो ज्ञानवृक्ष आहे. त्याची मुळे खूप आतवर खोलवर गेली आहे. ती स्थिरता प्रदान करतात. त्याची फुले म्हणजे आपली नैतिक कृत्ये आहेत, त्या ज्ञानवृक्षाला धर्म(रुपी) हे फळ येते.
बौद्धपूर्व भारतात पवित्र वृक्षांची उदाहरणादाखल अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आधीच होती. त्यांच्याभोवती कडे असे.काही अर्पण करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी मातीचा पार असे. वृक्ष स्वतःच देवता असे किंवा कधीकधी झाडाखाली लहानलहान देवांच्या मूर्ती प्रतिष्ठापित असत. त्यांना इच्छा पूर्ण करणारे आणि हवे ते देणारे म्हणून पाहिले जात असे.
पीटर हार्वे. प्राचीन बौद्ध धर्मातील पूजनीय वस्तू आणि प्रतीके. कुमारस्वामी.
वरील चित्र बोधगयामधील बोधी वृक्ष आहे.
बुद्धांनी आपल्या भिक्षूंना अनेकदा ध्यानप्राप्तीसाठी झाडाखालच्या जागेची जागा म्हणून शिफारस केली. त्यांनी स्वतः, ज्ञानप्राप्तीच्या पूर्वसंध्येला, एका पिंपळाच्या (अश्वत्थाच्या )झाडाखाली ध्यान करण्याचा पर्याय निवडला. हेच कदाचित पूर्वीचे वृक्ष मंदिर असेल. बुद्ध ज्ञानप्राप्तीनन्तर चार आठवडे (काहींच्या मते सात आठवडे) बोधी वृक्षाजवळ राहिले. स्वाभाविकच, बोधी वृक्ष त्यांच्या ज्ञानप्राप्तीसाठीचे प्रतीक बनला. नंतर तो बोधिवृक्ष ज्ञानप्राप्तीच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करू लागला. असाही दावा केला जातो की बुद्धांनी बोधी वृक्ष त्यांच्या शिकवणुकीचे प्रतिनिधित्व करतो.
बुद्धांना सांची येथे कल्पवृक्ष किंवा इच्छा वृक्षाच्या स्वरूपात दर्शविले आहे. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत संपूर्ण अवकाशात पसरलेली ही जीवनाची बाग आहे. बौद्ध धर्म नैतिक दृष्टिकोनातून देखील जीवनवृक्षाला दर्शवतो. तो ज्ञानवृक्ष आहे. त्याची मुळे खूप आतवर खोलवर गेली आहे. ती स्थिरता प्रदान करतात. त्याची फुले म्हणजे आपली नैतिक कृत्ये आहेत, त्या ज्ञानवृक्षाला धर्म(रुपी) हे फळ येते.
बौद्धपूर्व भारतात पवित्र वृक्षांची उदाहरणादाखल अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आधीच होती. त्यांच्याभोवती कडे असे.काही अर्पण करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी मातीचा पार असे. वृक्ष स्वतःच देवता असे किंवा कधीकधी झाडाखाली लहानलहान देवांच्या मूर्ती प्रतिष्ठापित असत. त्यांना इच्छा पूर्ण करणारे आणि हवे ते देणारे म्हणून पाहिले जात असे.
पीटर हार्वे. प्राचीन बौद्ध धर्मातील पूजनीय वस्तू आणि प्रतीके. कुमारस्वामी.
वरील चित्र बोधगयामधील बोधी वृक्ष आहे.