अहिल्याबाई प्रशासनिक सर्व बाबींमध्ये निपुण होत्या. त्यांनी वैयक्तिक निधी राज्य निधीपासून वेगळा ठेवला. कर वसुली आणि युद्धात जमा झालेली लूट यामधून पेशव्यांचा वाटा जमा करण्यात त्या कुशल होत्या. त्यांनी चालवलेली न्यायव्यवस्था जलद, निःपक्षपाती आणि भावनाप्रधान विचार करणारी होती. ही व्यवस्था व्यावहारिक होती आणि पंचायतींसारख्या संस्थांद्वारे मिळणाऱ्या जलद न्यायाचा आदर करत होती. त्यांचे धर्मादाय कार्य अर्थातच प्रसिद्ध आहे आणि भारतातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांनी अहिल्याबाईंचे योगदान पाहिले आहे. सर्व धर्मादाय कार्य सार्वजनिक निधीतून नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून केले जात असे.
स्कॉटिश महिला कवयित्री जोआना बेली यांनी लिहिले की,
“For thirty years her reign of peace, The land in blessing did increase;
And she was blessed by every tongue, By stern and gentle, old and young.
Yea, even the children at their mothers feet, are taught such homely rhyming to repeat.
In latter days from Brahma came, To rule our land, a noble Dame,
Kind was her heart, and bright her frame, and Ahilya was her honoured name.”
“तीस वर्षे तिचे शांतीचे राज्य,
आशीर्वादाने भूमी वाढली;
आणि तिला प्रत्येक व्यक्तीने , जी कठोर असो कि सौम्य, वृद्ध असो कि तरुण प्रत्येकाने आशीर्वाद दिला.
नंतरच्या काळात ब्रह्मापासून आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी एक उदात्त महिला आली,
तिचे हृदय दयाळू होते आणि तिची शरीरयष्टी तेजस्वी होती, आणि अहिल्या तिचे सन्माननीय नाव होते.”
सर जॉन माल्कम ज्यांची मराठ्यांच्या तलवारीशी गाठ पडली;ते १९ व्या शतकाच्या सुरुवातीचे मुंबईचे गव्हर्नर होते.त्यांनी अहिल्याबाईंबद्दल लिहिले आहे, “अहिल्याबाईंच्या लोकोत्तर क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या प्रजेचा आणि नाना फडणवीसांसह इतर मराठा सहकाऱ्यांच्या आदरास पात्र ठरल्या.माळव्याच्या स्थानिकांमध्ये…त्यांचे नाव संतासमान आहे. त्या दैवी अवतार आहेत असेच समजले जाते.त्यांचे चरित्र अत्यन्त संयमित दृष्टिकोनातून अभ्यासले तरी,हे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही की त्या निश्चितच त्यांच्या मर्यादित वर्तुळात आतापर्यंतच्या सर्वात पवित्र आणि आदर्श शासकांपैकी एक होत्या.”
अहिल्याबाई प्रशासनिक सर्व बाबींमध्ये निपुण होत्या. त्यांनी वैयक्तिक निधी राज्य निधीपासून वेगळा ठेवला. कर वसुली आणि युद्धात जमा झालेली लूट यामधून पेशव्यांचा वाटा जमा करण्यात त्या कुशल होत्या. त्यांनी चालवलेली न्यायव्यवस्था जलद, निःपक्षपाती आणि भावनाप्रधान विचार करणारी होती. ही व्यवस्था व्यावहारिक होती आणि पंचायतींसारख्या संस्थांद्वारे मिळणाऱ्या जलद न्यायाचा आदर करत होती. त्यांचे धर्मादाय कार्य अर्थातच प्रसिद्ध आहे आणि भारतातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांनी अहिल्याबाईंचे योगदान पाहिले आहे. सर्व धर्मादाय कार्य सार्वजनिक निधीतून नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून केले जात असे.
स्कॉटिश महिला कवयित्री जोआना बेली यांनी लिहिले की,
“For thirty years her reign of peace, The land in blessing did increase;
And she was blessed by every tongue, By stern and gentle, old and young.
Yea, even the children at their mothers feet, are taught such homely rhyming to repeat.
In latter days from Brahma came, To rule our land, a noble Dame,
Kind was her heart, and bright her frame, and Ahilya was her honoured name.”
“तीस वर्षे तिचे शांतीचे राज्य,
आशीर्वादाने भूमी वाढली;
आणि तिला प्रत्येक व्यक्तीने , जी कठोर असो कि सौम्य, वृद्ध असो कि तरुण प्रत्येकाने आशीर्वाद दिला.
नंतरच्या काळात ब्रह्मापासून आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी एक उदात्त महिला आली,
तिचे हृदय दयाळू होते आणि तिची शरीरयष्टी तेजस्वी होती, आणि अहिल्या तिचे सन्माननीय नाव होते.”
सर जॉन माल्कम ज्यांची मराठ्यांच्या तलवारीशी गाठ पडली;ते १९ व्या शतकाच्या सुरुवातीचे मुंबईचे गव्हर्नर होते.त्यांनी अहिल्याबाईंबद्दल लिहिले आहे, “अहिल्याबाईंच्या लोकोत्तर क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या प्रजेचा आणि नाना फडणवीसांसह इतर मराठा सहकाऱ्यांच्या आदरास पात्र ठरल्या.माळव्याच्या स्थानिकांमध्ये…त्यांचे नाव संतासमान आहे. त्या दैवी अवतार आहेत असेच समजले जाते.त्यांचे चरित्र अत्यन्त संयमित दृष्टिकोनातून अभ्यासले तरी,हे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही की त्या निश्चितच त्यांच्या मर्यादित वर्तुळात आतापर्यंतच्या सर्वात पवित्र आणि आदर्श शासकांपैकी एक होत्या.”