304

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर : एक अमृत वारसा

देवी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी,म्हणजे बरोब्बर ३०० वर्षांपूर्वी झाला होता. त्या जवळजवळ ५० वर्षे होळकर घराण्याच्या राजमाता होत्या. आपल्या भारतास इंदूर प्रांतास लाभलेल्या देवी अहिल्या या सर्वात महान शासनकर्त्या होत्या. 

या १२ प्रश्नांच्या प्रश्नमंजुषेत, आपण अहिल्याबाईंच्या जीवनशैली, कर्तृत्व आणि त्यांच्या संघर्षाबद्दल माहिती करून घेऊ. 

अहिल्याबाईंना राणी कोणी बनवले? त्यांनी राज्य कुठून केले? त्यांना कोणत्या नेत्याने तत्वज्ञानी शासन कर्त्या म्हणून संबोधले आहे? देशी आणि विदेशी अभ्यासकांनी त्यांच्या बद्दल काय गौरवोद्गार काढले आहेत ? कोणत्या विमानतळास त्यांचे नाव देण्यात आले आहे? 

या प्रश्न मंजुषेच्या ५ भाग्यवान विजेत्यांना  डॉ. उदय कुलकर्णी यांनी लिहिलेले “द मराठा सेंच्युरी” हे पुस्तक भेट म्हणून प्राप्त होणार आहे.

पुण्याजवळील कोणत्या शहराचे नाव अहिल्यानगर असे ठेवण्यात आले आहे? अहिल्या देवींचा जन्म याच शहराजवळ झाला होता

अहिल्याबाईंना घडवण्यात महान मराठा नेते मल्हारराव होळकर यांचा वाटा होता. मल्हारराव होळकर अहिल्याबाईंचे कोण होते?

अहिल्याबाईंनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राज्यकारभार सुरु केला ?

भारतातील कोणत्या शहरातील विमानतळास देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ असे नामकरण केले गेले आहे?

अहिल्यादेवी होळकर यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणास गादीवर बसवण्यात आले.

अहिल्याबाईंनी महेश्वर येथे एक विशिष्ठ उत्पादन सुरू केले ज्यासाठी ते अजूनही प्रसिद्ध आहे. ते काय आहे?

कोणत्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग शिव मंदिराचे नूतनीकरण अहिल्याबाईंशी कायमचे जोडले गेले आहे ? नूतनीकरण केलेल्या संकुलात अहिल्याबाईंची मूर्ती अलीकडेच स्थापित करण्यात आली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या परिवारातील बहुतेक महिलांनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या. परंतु अहिल्यादेवींना सती न जाण्याबद्दल कोणी राजी केले?

अहिल्याबाई एक कुशल योद्धा होत्या. त्यांनी एका मोठ्या शत्रूविरुद्ध लढाई लढून प्रतिकार केला होता. तो शत्रू कोण होता?

कोणत्या प्रसिद्ध भारतीय नेत्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की अहिल्यादेवी ह्या एक ‘तत्वज्ञानी राणी’ होत्या आणि “त्यांची कारकीर्द परिपूर्ण सुव्यवस्था आणि उत्तम प्रशासनासाठी प्रसिद्ध होती”?

हिंदू धर्माचा कोणता पैलू मराठ्यांच्या कारकिर्दीत आणि विशेषतः अहिल्याबाईंनी पुनरुज्जीवित केला ?

अहिल्याबाईंनी धर्मादाय आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी कोणत्या तीर्थ गटाची निवड केली होती?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In