152

भक्तीमार्गावरील वाटाडे. – संतकवी

आज लोकप्रिय भक्तीमार्गावरील संतकवी कबीर यांची जयंती आहे. भक्तीची कल्पना, देवाप्रती समर्पण, प्राचीन आहे. ईशोपनिषद आणि गीता यांमधे भक्तीचे महत्व सांगितले आहे. भक्तीकाव्य बहुतेक इ.स. सहाव्या शतकात तमिळ प्रदेशात उगम पावले आणि संपूर्ण भारतात पसरले. एका संस्कृत श्लोकात म्हटले आहे की, “भक्तीचा जन्म द्राविड प्रदेशात झाला, कर्नाटकात ती परिपक्व झाली , महाराष्ट्रात तिला स्त्रीत्व प्राप्त झाले, गुजरात मध्ये ती सशक्त व शहाणी झाली , वृंदावनला पोहोचली आणि ती एक सुरेख तरुणी म्हणून पुन्हा उदयास आली”. या १२ प्रश्नांच्या प्रश्नमंजुषेत, आपण आपल्या भूमी वरील, भक्ती संतांबद्दल जाणून घेणार आहोत. अँड्र्यू शेलिंग यांच्या भक्तीकाव्याचा उत्तम संग्रह या प्रश्नमंजुषेचा पाया आहे. सहभागी होणाऱ्यांतील पाच भाग्यवंतांना बिबेक देबरॉय यांचे “भगवद्गीता फॉर मिलेनिअल्स” भेट म्हणून दिले जाईल.

तमिळ प्रदेशात, ६व्या आणि १०व्या शतकादरम्यान, वैष्णव परंपरेतील संतांचा असा कोणता गट होता की ज्यांनी आपल्या उत्कट भक्तीकाव्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली?

अक्का महादेवी १२व्या शतकातील विरशैव संत होत्या. तिची रूढीविरोधी ‘वचने’ ही निषेधाची कविता म्हणून अतुलनीय आहेत. तिने कोणत्या भाषेत लिहिले?

इ.स. १३०० मधील लाल देद किंवा लल्ला ही अशा पहिल्या भक्तीमार्गी संतसमुदायातील एक होती की ज्यांना हिंदू आणि मुस्लिम दोघेही आपल्या समाजातील समजत. त्या कुठे राहत होत्या ?

धुर्जटी हे १६ व्या शतकाच्या मध्यातले संत होते जे त्यांच्या तिरुपतीजवळील श्री कालहस्ती मंदिरातील देवाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध होते. हे मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे?

यातील कोणते संत महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी संत परंपरेतील नाहीत?

अखा भगत किंवा अखो यांनी सामाजिक रीतिरिवाजांवर टीका करणारे भेदक गुजराती काव्य लिहिले. त्यांच्या सहा ओळींच्या कवितांना काय म्हणतात?

अंध संत सूरदास हे कृष्णावरील त्यांच्या कवितांच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी कोणत्या उत्तर भारतीय बोलीभाषेत रचना केली?

पंतप्रधान मोदींनी दलित चर्मकार समाजातील या भक्तीमार्गी संतकवीचे उदाहरण, नेत्याची भूमिका त्याच्या लोकांसाठी अन्न आणि समानता सुनिश्चित करणे आहे ह्यावर भर देण्यास दिले होते. हा कवी कोण आहे?

अकबराच्या दरबारातील कोणत्या नवरत्नाने (नऊ रत्ने) भक्ति कविता लिहिली जी आजही हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय आहे?

ते देवाची भक्ती करणारे भटके लोक आहेत. – बंगालमधील प्रवासी गायक-वादक जे गावोगावी जाऊन देवाची स्तुती करतात आणि धार्मिक विधी आणि जातीपातीचा कडवा विरोध करतात. ते कोण आहेत?

कबीर मरण पावले तेव्हा, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अंत्यसंस्काराचे विधी कोणते यावरून भांडण झाले. जेव्हा कफन उचलले तेव्हा त्यांचे पार्थिवाचे कशात रूपांतर झाले होते असे म्हटले जाते?

कोणत्या महान बंगाली समाजसुधारक आणि आधुनिकतावाद्याने उत्कृष्ट भक्तीकविता लिहिण्यासाठी भानुसिंह हे टोपणनाव स्वीकारले?

बाहेर पडा

How did you like this quiz?

Get quiz links

We will send you quiz links at 6 AM on festival days. Nothing else 

Opt In