रेझांग लाची लढाई ही अविस्मरणीय अशी एक ऐतिहासिक लढाई आहे. या लढाईत 13 कुमाऊँ बटालियनच्या मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैनिकांनी अद्वितीय शौर्याचे दर्शन घडवले. त्यांची कंपनी इतर भारतीय तुकड्यांपासून पूर्णपणे विलग अश्या दूरवरच्या ठिकाणी तैनात होती.
18 नोव्हेंबर 1962 रोजी, चीनने या भागावर तोफगोळ्यांसह प्रचंड हल्ला चढवला आणि अनेक तुकड्या पाठवून मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. याप्रसंगी मेजर शैतान सिंग आणि त्यांची कंपनी रणभूमीवर खंबीरपणे उभी राहिली. मेजर शैतान सिंग स्वतःचा जीव धोक्यात घालून एका प्लाटूनमधून दुसऱ्या प्लाटूनकडे जाऊन आपल्या सैनिकांना मार्गदर्शन करीत प्रेरणा देत राहिले.
त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने शत्रूच्या अनेक चढाया परतवून लावल्या. अखेरीस मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी आपली जागा सोडली नाही. या एकाच लढाईत भारताचे 114 जवान शहीद झाले. चीनचे चार ते पाच पटींनी अधिक नुकसान झाले होते.
शेवटी, जखमा अतिशय गंभीर झाल्याने मेजर शैतान सिंग कोसळले. त्यांच्या सैनिकांनी त्यांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आदेश दिला की ते लढा सुरू ठेवावा आणि त्यांना तसेच सोडून द्यावे.
या लढाईची तीव्रता इतकी होती की युद्ध संपल्यानंतरच्या पाहणीसाठी आलेल्यांना अनेक सैनिक आपापल्या बंकरमध्ये अजूनही शस्त्र हातात घेऊन लढण्याच्या स्थितीत सापडले. एक मोर्टारमन तर हातात बॉम्ब धरूनच मृत्यू पावला होता.
या युद्धासाठी एक परमवीरचक्र, आठ वीरचक्र, चार सेना पदके आणि एक “मेंशन इन डिस्पॅच” हे सर्व सन्मान प्रदान करण्यात आले.
रेझांग लाची लढाई ही अविस्मरणीय अशी एक ऐतिहासिक लढाई आहे. या लढाईत 13 कुमाऊँ बटालियनच्या मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैनिकांनी अद्वितीय शौर्याचे दर्शन घडवले. त्यांची कंपनी इतर भारतीय तुकड्यांपासून पूर्णपणे विलग अश्या दूरवरच्या ठिकाणी तैनात होती.
18 नोव्हेंबर 1962 रोजी, चीनने या भागावर तोफगोळ्यांसह प्रचंड हल्ला चढवला आणि अनेक तुकड्या पाठवून मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. याप्रसंगी मेजर शैतान सिंग आणि त्यांची कंपनी रणभूमीवर खंबीरपणे उभी राहिली. मेजर शैतान सिंग स्वतःचा जीव धोक्यात घालून एका प्लाटूनमधून दुसऱ्या प्लाटूनकडे जाऊन आपल्या सैनिकांना मार्गदर्शन करीत प्रेरणा देत राहिले.
त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने शत्रूच्या अनेक चढाया परतवून लावल्या. अखेरीस मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी आपली जागा सोडली नाही. या एकाच लढाईत भारताचे 114 जवान शहीद झाले. चीनचे चार ते पाच पटींनी अधिक नुकसान झाले होते.
शेवटी, जखमा अतिशय गंभीर झाल्याने मेजर शैतान सिंग कोसळले. त्यांच्या सैनिकांनी त्यांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आदेश दिला की ते लढा सुरू ठेवावा आणि त्यांना तसेच सोडून द्यावे.
या लढाईची तीव्रता इतकी होती की युद्ध संपल्यानंतरच्या पाहणीसाठी आलेल्यांना अनेक सैनिक आपापल्या बंकरमध्ये अजूनही शस्त्र हातात घेऊन लढण्याच्या स्थितीत सापडले. एक मोर्टारमन तर हातात बॉम्ब धरूनच मृत्यू पावला होता.
या युद्धासाठी एक परमवीरचक्र, आठ वीरचक्र, चार सेना पदके आणि एक “मेंशन इन डिस्पॅच” हे सर्व सन्मान प्रदान करण्यात आले.