आदिशेषाचा जन्म महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी कद्रू यांच्या पोटी झाला. कद्रूने एक हजार सर्पांना जन्म दिला, ज्यामध्ये शेष हा सर्वात मोठा होता. शेषाच्या जन्मानंतर अनुक्रमे वासुकी, इरावती आणि तक्षक यांचा जन्म झाला. हे सर्व गरुडाचे (विनतेचा पुत्र) ह्याचे सावत्र भाऊ.
आपल्या बंधूंच्या क्रूर कृत्यांमुळे कंटाळून, शेषाने आपली माता आणि बांधवांचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्या आचरली.
ब्रह्मदेवाने त्याला ही पृथ्वी सांभाळण्याचे वरदान दिले.
आदिशेषाला अनंत असेही म्हणतात. अनंत या नावाचा अर्थ अंतहीन असून ते वैश्विक काळाच्या अनंततेचे प्रतीक आहे.
शेषाने पृथ्वीवर सहा अवतार धारण केले असावेत, असे मानले जाते. सत्ययुगात, अधर्मी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी अवतरलेल्या विष्णूच्या ‘नृसिंह’ अवतारासाठी आसन निर्माण करण्याकरिता, तो आपल्या मूळ स्वरूपात पृथ्वीवर अवतरला.
त्रेतायुगात, शेषाने विष्णूचा (रामाच्या रूपातील) बंधू म्हणून ‘लक्ष्मण’ या नावाने जन्म घेतला. द्वापारयुगात, त्याने पुन्हा विष्णूचा (कृष्णाच्या रूपातील) बंधू म्हणून ‘बलराम’ या नावाने अवतार धारण केला, असे सांगितले जाते.
कलियुगात, श्रीवैष्णव संप्रदायाच्या परंपरेनुसार, त्याने पतंजली, रामानुज आणि मानवला मामुनिगल या रूपांत जन्म घेतला. लक्ष्मण हा आदिशेषाचा अवतार आहे. काही जण बलरामाला साक्षात विष्णूचाच अवतार मानतात.
संपूर्ण भारतात सर्पपूजा लोकप्रिय आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये, पूर्णपणे सर्प देवतांना समर्पित मंदिरे आहेत (उदा. केरळमधील मन्नारशाला).
हे चित्र केरळमधील मन्नारशाला मंदिरातील आहे.
आदिशेषाचा जन्म महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी कद्रू यांच्या पोटी झाला. कद्रूने एक हजार सर्पांना जन्म दिला, ज्यामध्ये शेष हा सर्वात मोठा होता. शेषाच्या जन्मानंतर अनुक्रमे वासुकी, इरावती आणि तक्षक यांचा जन्म झाला. हे सर्व गरुडाचे (विनतेचा पुत्र) ह्याचे सावत्र भाऊ.
आपल्या बंधूंच्या क्रूर कृत्यांमुळे कंटाळून, शेषाने आपली माता आणि बांधवांचा त्याग केला आणि कठोर तपश्चर्या आचरली.
ब्रह्मदेवाने त्याला ही पृथ्वी सांभाळण्याचे वरदान दिले.
आदिशेषाला अनंत असेही म्हणतात. अनंत या नावाचा अर्थ अंतहीन असून ते वैश्विक काळाच्या अनंततेचे प्रतीक आहे.
शेषाने पृथ्वीवर सहा अवतार धारण केले असावेत, असे मानले जाते. सत्ययुगात, अधर्मी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी अवतरलेल्या विष्णूच्या ‘नृसिंह’ अवतारासाठी आसन निर्माण करण्याकरिता, तो आपल्या मूळ स्वरूपात पृथ्वीवर अवतरला.
त्रेतायुगात, शेषाने विष्णूचा (रामाच्या रूपातील) बंधू म्हणून ‘लक्ष्मण’ या नावाने जन्म घेतला. द्वापारयुगात, त्याने पुन्हा विष्णूचा (कृष्णाच्या रूपातील) बंधू म्हणून ‘बलराम’ या नावाने अवतार धारण केला, असे सांगितले जाते.
कलियुगात, श्रीवैष्णव संप्रदायाच्या परंपरेनुसार, त्याने पतंजली, रामानुज आणि मानवला मामुनिगल या रूपांत जन्म घेतला. लक्ष्मण हा आदिशेषाचा अवतार आहे. काही जण बलरामाला साक्षात विष्णूचाच अवतार मानतात.
संपूर्ण भारतात सर्पपूजा लोकप्रिय आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये, पूर्णपणे सर्प देवतांना समर्पित मंदिरे आहेत (उदा. केरळमधील मन्नारशाला).
हे चित्र केरळमधील मन्नारशाला मंदिरातील आहे.