व्यंकोजी राजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. त्यांनी सन १६७६ मध्ये विजापूर सल्तनतीसाठी तंजावर जिंकले, परंतु नंतर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. अत्यंत सुपीक किनारपट्टी असलेल्या तंजावरला स्वतःची समुद्री बंदरे होती. तंजावर हा एक अत्यंत मौल्यवान ठेवा होता.
दक्षिण दिग्विजयच्या काळात, शिवाजी महाराजांनी गोळकोंड्याच्या राजवटीशी करार केला, श्रीशैलमला भेट दिली, जिंजी किल्ला व वेल्लोरवर हल्ला केला. तंजावरजवळ कोलिदम नदीच्या उत्तरेला त्यांनी तळ ठोकला आणि व्यंकोजींना चर्चेसाठी आमंत्रित केले. आपल्या वडिलांच्या बंगळुरू जागिरीचा भाग असलेल्या तंजावरचा वाटा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीकडे मागितला. महाराज आपल्याला अटक करतील या भीतीने, व्यंकोजी तंजावरला परत पळून गेले. सावत्र भावाने त्यांच्या हेतूंचा गैरसमज केल्यामुळे शिवाजी महाराज नाराज झाले असे मानले जाते. त्यांनी तंजावरवर आक्रमण केले नाही पण तंजावरच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेतला. मराठ्यांच्या राजवटीत, तंजावर हे शतकाहून अधिक काळ संस्कृती, संगीत, नाटक आणि साहित्याचे उगमस्थान होते. राजे, विशेषतः सर्फोजी, कलांचे खरे संरक्षक होते.
सोबतचे चित्र तंजावर येथील मराठा राजवाड्याचे आहे, पी. जगन्नाथन, विकिमीडिया कॉमन्स
स्रोत: शिवाजी अँड हिज टाइम्स, जदुनाथ सरकार
व्यंकोजी राजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. त्यांनी सन १६७६ मध्ये विजापूर सल्तनतीसाठी तंजावर जिंकले, परंतु नंतर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. अत्यंत सुपीक किनारपट्टी असलेल्या तंजावरला स्वतःची समुद्री बंदरे होती. तंजावर हा एक अत्यंत मौल्यवान ठेवा होता.
दक्षिण दिग्विजयच्या काळात, शिवाजी महाराजांनी गोळकोंड्याच्या राजवटीशी करार केला, श्रीशैलमला भेट दिली, जिंजी किल्ला व वेल्लोरवर हल्ला केला. तंजावरजवळ कोलिदम नदीच्या उत्तरेला त्यांनी तळ ठोकला आणि व्यंकोजींना चर्चेसाठी आमंत्रित केले. आपल्या वडिलांच्या बंगळुरू जागिरीचा भाग असलेल्या तंजावरचा वाटा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीकडे मागितला. महाराज आपल्याला अटक करतील या भीतीने, व्यंकोजी तंजावरला परत पळून गेले. सावत्र भावाने त्यांच्या हेतूंचा गैरसमज केल्यामुळे शिवाजी महाराज नाराज झाले असे मानले जाते. त्यांनी तंजावरवर आक्रमण केले नाही पण तंजावरच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेतला. मराठ्यांच्या राजवटीत, तंजावर हे शतकाहून अधिक काळ संस्कृती, संगीत, नाटक आणि साहित्याचे उगमस्थान होते. राजे, विशेषतः सर्फोजी, कलांचे खरे संरक्षक होते.
सोबतचे चित्र तंजावर येथील मराठा राजवाड्याचे आहे, पी. जगन्नाथन, विकिमीडिया कॉमन्स
स्रोत: शिवाजी अँड हिज टाइम्स, जदुनाथ सरकार